Thursday, February 3, 2011

संत तुकाराम ! आक्षेप व खंडन - १



तुकाराम महाराज आक्षेप व खंडन, तुकाराम महाराज व ब्राम्हण :

ब्राम्हणांची निंदा व द्वेष हा विद्रोही विचारवंतांचा स्थायी भाव आहे. त्यांचा मागमुस ही तुकाराम महाराजांच्या साहित्यात नाही. आपण जसा चष्मा वापरतो तसे सर्व जग आपणाला दिसते. आपला चष्मा तर व्याभिचाराचा असेल तर तशी माणसे रामदास स्वामींसारख्या संतांवर देखिल व्याभिचाराचा आरोप लावतात. हा या चष्म्याचा गुण आहे. 

ब्राम्हणांत १) जातीचा ब्राम्हण, २) लक्षणाचा ब्राम्हण हे दोन प्रकर आहेत. तुकाराम महाराज हे या दोन्ही ब्राम्हणांचा आदर करवा असा उपदेश करतात. तुकाराम महाराज लक्षणाच्या ब्राम्हणाचे लक्षण सांगतात की ......

ब्राम्हण तो याती आंत्यज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ॥ 
रामकृष्ण नामे उच्चारी सरळ । आठवी सावळे रूप मनी ॥
शांती क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥
तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंग । सांडूनिया मग ब्राम्हण तो ॥ 


अर्थ : जातिने अंत्यज असला तरई त्याचा आचारविचार शुद्ध आहे तो लक्षणाने खरा ब्राम्हण आहे हे निश्चित. याठिकाणी लक्षणाचा ब्राम्हण कोणता हे सांगुन ते ही पूज्य आहेत हे सांगितले आहे.

वैष्णवमुनी विप्रांचा सन्मान । करावा आपण होऊ नये ॥

याठिकाणी वैष्णवी, संत, ब्राम्हण, सन्यासी यांचा यथायोग्य, यथाशक्ती सत्कार करावा. पण आपण त्यांच्याकडुन सत्कार घेऊ नये. असे संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज हे ब्राम्हणद्वेष्टे नव्हते. उलट तुकाराम महाराज पुर्विच्या सर्व जातीतील संतांचा आदर करतात. संत, वारकरी, भक्त, याना जातिचे बंधण नसते. जो कोणी पंढरीची वारी करणारास वैष्णवांना, संताना हा आमच्या जातीचा नाही, त्यास माणायचे नाही असे म्हणेल तर तो वारकरी सांप्रदायीक विचारांचा मुळीच नाही. तसेच हे महाराज, संत, वारकरी आपल्या भागातील नाहीत त्यांचा आदर करू नये अशी शिकवण जर कोणी आपल्या अनुयायाना देत असेल तर ते क्षुद्र विचारांचे असुन वारकरी सांप्रदायीक म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. संताना जातीची व भागाची बंधने नसतात. त्यांना जातीच्या बंधनात अडकवणे महापाप आहे. आणि जर संतांना जातीची बंधने असती तर ज्ञानेश्वर महाराजानी धरणेकर्‍यास तुकराम महाराजांकडे पाठवले नसते. शिवाय तुकराम महाराज जर जातियवादी असते तर त्यानी ज्ञानेश्वर महाराजांचे, एकनाथ महाराजांचे, श्रीसमर्थ रामदास स्वामिंचे वर्णन केले नसते. परंतु तुकराम महाराज तर ज्ञानेश्वर महारादी संतांचे तोंड भरून वर्णन करतात.

काय ज्ञानेश्वरि उणे । तिही पाठविली धरणे ॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायपे किंकरा ॥
ज्ञानियांचा राज गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥
मज पामरा काय ते थोरपण । पायीची वाहण पायी बरी ॥
तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली । म्हणोनी ठोविली पायी डोयी ॥ 


इत्यादी अभंगानी तुकाराम महाराजानी वर्णन केलेले आढळून येते. आणि तुकाराम महाराज जर ज्ञानेश्वर महाराजांचे आदी संतांस परमपूज्य मानतात तर हे विद्रोहीवाले मात्र ब्रम्हणद्वेषापोटी ज्ञानेश्वर महाराज आदी संतांचा द्वेष्करतात. कारण...

झविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥
करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥ 


म्हणून तुकाराम महाराजांच्या साहीत्यात कोठे ही ब्राम्हणद्वेष अथवा ब्रम्हनांची निंदा दिसुन येत नाही. म्हणून त्याना "विद्रोही तुकाराम" य नावाने संबोधने महाहलकटपणा आहे.

जरी तो ब्राम्हण झाला कर्म भ्रष्ट ।
तरी तुका म्हणे श्रेष्ट तिही लोकी ॥
 

हे वचन विद्रोही विचारवंत संत रामदासांच्या नावावर सांगतात. व रामदासांना ब्राम्हणवादी ठरवतात. पण हे वचन तुकाराम महाराजांचे आहे. हा संपूर्ण अभंग पाहीला तर विद्रोही लोकांची दातखिळी बसेल.

दुधाळ गाढवी जरी झाली पाहे । पावेल काय धेनू सरी ॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥
मर्कट आंघोळी लाविले टिळे । ब्राम्हणाचे लिळे वर्तू नये ॥
जरी तो ब्रम्हण झाला कर्म भ्रष्ट । तरी तुका म्हणे श्रेष्ट तिही लोकी ॥ 


विद्रोहीवाल्याना हा अभंग गैरसोईचा वाटला म्हणुन त्यना तो क्षेपक वाटला. काहीनी प्रश्नचिन्ह असावे असे अकलेचे तारे तोडले. पण विरामचिन्हे प्रचिन मराठीत नव्हती हे त्याना कोठून माहीत ! प्रश्नार्थक वाक्य सर्वनामावरुन ठरवले जाते, इथे कोठे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. शेवटचा सिद्धांत माणला तर हा अभंग काय म्हणतो याचा विचार या विद्रोहीवाल्यानी केलेला दिसत नाही. पण विद्रोहीवाल्यांची खोड आहे की आपल्या मतच्या विरोधी अभंग असेल तर तो प्रक्षीप्त आहे. ब्राम्हणानी आपल्या मतलबासाठी त्यात घुसडला आहे असे म्हणायचे.

जातीचा ब्राम्हण । न करी संध्या स्नान ॥
तो कशाचा ब्राम्हण । होय हीनाहून हिन ॥ 


तुकाराम महाराजांनी भ्रष्ट, भक्तिहीन ब्राम्हणाची निंदा केली आहे. म्हणुन ते विद्रोही ठरत नाहीत. कारण ब्राम्हणानी आपला स्वधर्म पाळावा असे संगण्याचे तात्पर्य आहे आणि अशा ब्राम्हणांची निंदा समर्थ रामदास स्वामी व ज्ञानेश्वर महाराज यांनी ही केली आहे. मग त्यानाही विद्रोही म्हणावो लागेल. उलट प्रत्येक वर्गाने आपले कर्म करावे असेच तुकोबाराय सांगतात.

वर्णाश्रम करीसी चोख । तरी तो पावशी उत्तम लोक ॥

तरीपण ईश्वराच्या भक्ति करिता वर्ण, जाती, आश्रम, यांची आडकठी नाही. सर्वाना अधिकार आहे. परमार्थात उच्च निच कोणी नाही. हा विचार ज्ञानेश्वर महाराजांपासुन तुकाराम महाराज पावेतो सर्व संतानी मांडला आहे.

सध्या तुकारामांना फक्त बहुजनांचे गुरु ठरवून त्यांच्या तोंडी ब्राह्मणांची निंदा करविण्याचे काम बीग्रेडीनी सुरु केले आहे. तुकाराम हे फक्त विशिष्ट जातीचे गुरु नव्हते तर ते जगद्गुरू होते. जेथे जेथे शक्य होईल तेंव्हा तेव्हा तुकाराम महाराजांनी लोकांना त्यांच्या जातीवार्ण प्रमाणे उपदेश केला आहे. ब्राह्मणांना ते ब्राह्मणाची कर्तव्ये करायला सांगतात तर कुणब्याला कुणब्याची.
 

आता खाली दिलेले अभंग पहा, हे तुकारामांच्या गाथेमधून उद्घृत केले आहेत.

हे वाचून तुम्ही असे म्हणाल का कि तुकाराम महाराज अल्ला के बंदे होते ?...

अभंग क्रमांक ४४३ :
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । 
गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥

ख्याल मेरा साहेबका। बाबा हुवा करतार । 
व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥

जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । 
कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥

अभंग क्रमांक ४४४ :
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे। 
अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥

मदऩ होये वो खडा फीर नामदऩकुं नहीं धीर । 
आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । 
इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥

जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । 
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । 
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । 
तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥

जय जय रघुवीर समर्थ !!!