Monday, December 6, 2010

सर्व सामान्य जीवन प्रवास

व्हय म्हाराजा !

शालेय विद्यार्थी = खेळ, पाकीटमनी, अभ्यासात कंटाळा / अतिअभ्यास, स्कॉलर 
कॉलेज तरुण = पोरगी, पाकीटमनी, बंक, हुंदडणे, गोसिप्स, अभ्यासात कंटाळा / अतिअभ्यास, डिग्री, पदवी
पदवीधर = उच्च पदवीधर शिक्षण, सोबत एक लफड, नोकरीची धडपड, आई-वडिलांकडून विवाहाचे सल्ले, खर्चाचा ताण, अभ्यास,
उच्च पदवीधर = सरकारी / खाजगी नोकरी, यथासांग वेतन, पगार, विवाहित-संसार, नसल्यास शोध चालू, मोठमोठ्या सहली, गप्पा अथवा काही तरी अजून शिक्षण

(क्रम चुकल्यास समजून घेणे) या सगळ्यांत काही कला पण असतात तेहि आपल्या क्षेत्रात/कार्यात पुढें जातात. ह्या सगळ्या घटनांत व घटकांत आपण आपल्या जन्मभूमिस, कर्मभूमीस, किती वेळ आणि कसा वेळ देतो यांचे महत्व लक्षात घ्या. हा सर्व प्रत्येक जीवांचा प्रवास आहे. आपल्यावर बालपणा पासून झालेले संस्कार हें कसे अनमोल असतात ते प्रवासाच्या शेवटी कळतात आपण कसे चुकलो, कोठे चुकलो, विचार काय हवेत, संगत कोणाची हवी होती. हें सर्व प्रश्न आपल्याला सरत्या शेवटी सोडवून काही फायदा नसतो. पोट चालवण्या करता उत्पन्न हवेच, तो पण करा, पण आपला समाज हि तितकाच स्वच्छ हवा. मग आपले वय आज काय आहे आणि आपण कुठे आहोत हें प्रत्येकासच माहित आहे. वेळ कमी आहे संघटीत व्हा....एक विचार व त्यावर एकच कृती आवश्यक (पुस्तकी शिक्षण जेवढे आवशयक आहेत तेवढेच सामाजिक शिक्षण जरुरी आहे)            

जननी जन्म भूमि स्वर्ग से महान
इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है


इसके कण- कण मैं लिखा रामकृष्ण नाम है
हुतात्माओं के रुधिर से भूमि शस्य श्याम है

धर्म का ये धाम है सदा इसे प्रणाम है
स्वतंत्र है ये धरा स्वतंत्र आसमान है.....1

इसकी आन पे अगर जो बात कोई आ पङे
इसके सामने जो जुल्म के पहाङ हो खङे

शत्रु सब जहान हो ,विरूद्ध आसमान हो
मुकाबला करेंगे हम जब तक जान मैं ये जान हो ......2

इसकी गोद मैं हजारों गंगा यमुना झूमती
इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती

भूमि ये महान है निराली सकी शान है
इसकी जय पताका पे लिखा विजय निशान है.....3

सौजन्य : रा. स्व. संघ
  

Thursday, November 25, 2010

मुंबईत २६/११ मधील हुतात्म्यांना आदरांजली.

श्रीराम समर्थ !!!    

मुंबईत २६/११ मधील हुतात्म्यांना आदरांजली. कायदा व सुव्यवस्था झ॒क॒ मारत आहे आता कायदा हातात घेऊ आणि किमान आज तरी त्या क॒सा॒ब॒ (सरकारी पाहुण्याची) ठासु. पहिले त्या इटलीच्या सोनियाची च xxxx, कॉंग्रेस व त्यांना निवडून देणार्‍याचींच ठासु !




मुंबई - मुंबईवरील सर्वात भीषण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज (शुक्रवार) दोन वर्षे पूर्ण झाली असून, सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस जिमखान्यावर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम उपस्थित होते. पोलिसांनी ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलपासून गिरगावपर्यंत संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.

दहशतवाद्यांचे लक्ष्य असलेल्या ट्रायडेंट हॉटेलपासून पोलिसांचे संचलन सुरू झाले. यापुढे कोणत्याही प्रकारच्या हल्ला झाला, तरी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल हेच त्यातून दाखविण्यात आले. संचलनात फोर्स वन, क्विक रिस्पॉन्स टीम आणि मुंबई पोलिस सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सलामी दिल्यानंतर मरीन ड्राईव्ह मार्गाने गिरगावपर्यंत संचलन करण्यात आले.

या संचलनामध्ये अत्याधुनिक दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्याची क्षमता असलेली वाहने आणि शस्त्रांस्त्रांचेही प्रदर्शन करण्यात आले. ग्रेट वॉल ऑफ मुंबई, असे घोषवाक्य असलेला ट्रायडेंट हॉटेलपासून सुमारे १.३ किलोमीटर लांबीचा कापडी फलक, मुंबईतील शेकडो मुलांनी उचलून धरला होता.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, अल्पसंख्याक व्यवहारमंत्री अरीफ नसीम खान, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ या प्रसंगी उपस्थित होते.
हे सर्व झाले हो पण खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा हे सोनिया चे काँग्रेस जेव्हा त्यांचा खास अतिथी अ॒ज॒म॒ल॒ क॒सा॒ब॒ आणि त्याचे पळून गेलेले व छुपे साथीदार जेव्हा मृत्युदंड भोगतील.

मुळात सरकार आणि कायदा व सुव्यवस्था झक मारत आहे आणि त्यात २६/११ चा प्रसंग ओढवलेले सर्व मुंबईकर पुरावे असताना त्या हरामखोर कसाब ला सरकारी वकील मिळतो हेच मुळात संतापजनक आहे, त्याच्या कडून कबुली जवाब आलाना, प्रत्यक्ष पोलीस दलाने ने आणि कायद्याने पण तो हल्ला भोगला ना मग आता पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा आणि कसाबचा सरकारी वकील उच्च न्यायालयात जाण्या आधी त्याला सर्व मुंबईकरांच्या हवाली करा, एवढ्या लोकांचा बळी जाऊन देखील अजमल कसाब सारखा दहशतवादी जर भारताचा अतिथी म्हणून गौरवत असेल तर मुळात असे हरामखोर सरकार निवडून देणारे हि एक दहशतवादीच ठरतात. जागे व्हा आज २ वर्ष झालीत आता तरी जागे व्हा !!!

निद्रेत राहिलोत, वास्तव परिस्थिती कायमस्वरूपी निद्रेत पाठवेल !!!

श्रीराम समर्थ !!!    

Monday, November 15, 2010

काय म्हाराजा, कुट नौकरी करायचा इचार आला कि काय मनात !!!

श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन करून..................

काय म्हाराजा, पेपर मंदी काय वाचत हाय ! कुट नौकरी करायचा इचार आला कि काय मनात,
बर बर मग एक सांगतुया काय मी एक वर्तमानपत्र वाचलया त्यात व्हती येक मोट्टी जाहिरात म्हणे कोण्या येका कंपनीला कामगार हवेत, पात्रता (शिक्षण) काय बी चालल पन काम काय ते नाय दिला आणि मंग सहज गेलोया बगुया काय म्हने ती कंपनी.

मुलाखती साठी घेतली व्हती मोट्टी शाळा आणि त्यासाठी लई पोर झाली व्हती गोळा, अगदी बघा १० वी, १२ वी, आय. टी. आय अन पदवी (पडली बघ) धर असे सगळे जमल्यात. सगल्यांना शाळेत बुलावले म्हंजी नियम तर तिथही लागू व्हनारच म्हना मंग लाईनीन हुबी केली समद्यांना त्याच्या पात्रतेनुसार, मंग मेंढीच्या कळपागत समद्यांना बशिवल येकेका वर्गात आणि कंपनीची वोळख करून दिली, मंग बडबड आमची कंपनी कशी मोट्टी हाय तुम्ही हिथ कामाला लागला तर भविष्य उज्ज्वल, च्या मारी मी म्हनालो लाई झाक व्हील आपली निवड झाली तर !

आता या तर नी केला सगळा घोटाळा, समद्या पोरामंदून निवडणार फक्त २००-३०० आणि गम्मत काय बघा येवढी ढोर गोळा झालीय पन खरूखर त्ये शिक्षनाच्या आईचा घो केला न त्येच झाले आणि केले त्या कंपनीने कारण कंपनीची वोळख करून दिली आणि मंग कामाची माहिती व कालावधी सांगितला आणि या समद्या ढोरांची अक्कल समजली बघा ह काम xxxx, समद्या शिफ्ट मंदी अदलून-बदलून, येळ ८-९ तासच बाकी सुविधा लई झाक कॅन्टीन, बस आणि मेडीकल यापुढची गम्मत म्हंजी काम जे मिळणार त्ये हाय "कंत्राटी" म्हंजी या समद्या ढोरामंदी त्यांची परीक्षा उत्तीर्ण व्होउन मुलाखतीत निवडलेल्या ढोरांना फक्त ७ महीन काम करायला भेटणार मंग होतुंय कि न्हाई पोपट समद्या ढोरांचा, येवढी नामांकित कंपनी पन ती भी अशी वागतीय म्हणल्यावर मला सांग म्हाराजा या ढोरांना कायमची नौकरी मिळणार का ?

याचा अर्थ काय ७ महीन काम केल्यानंतर बस्तुया घरी आयता खाया किंवा होतुय चोर मवाली आनी फक्त हितच न्हाई तर समद्या ठिकाणी असंच चालंया आपली सरकार आणी काही खाजगी कंपन्या या कंत्राटी कामगार भरत राहिल्या तर साध्या लहान खेड्या मंदून त्ये मोट्ट्या शहरापर्यंत या समद्या शिक्षित / अर्धशिक्षित / अशिक्षित पोरांना त्याचं प्वॉट भरण्याकरता जागा आणि मौका राहणार का ? एकीकडे सरकार चालवती सर्व शिक्षा अभियान पन मी म्हनतुया या सरकारला अन अशा कंपन्यांना भी त्या अभियानात बशिवले पाहिजे आनि चांगली शिक्षा केली पाहिजे !!

बर तिथ काम केल्याच्या अनुभवावर दूसरीकड आपल्याला घ्येनार का कामासाठी नाही न मंग येवढी मोट्टी जाहिरात देऊन बऱ्याच पोरांना ख्वोट आमिष दाखवून का बर लुबाडायच आणि त्यातुं कमाई पन काही फार न्हाई आनि बाहेरून येणार्र्या पोरांना परत राहयसाठी जागा अन येक वेळच जेवण याचा खर्च कोण भागवणार, उर्र्मट फक्त पोर नसत्यात तर ही जादा शिकलेली ढोर भी असत्यात त्यामुळे जनजागृती बरोबर सरकार आणि नोकरदार यांची जागृती पन व्हायलाच पाहिजे नाहीतर येव्हड्या मोट्ट्या देशात त्या नागरीकांनसाठीच नोकरी अन धंदा राहणार न्हाई मंग गुन्हेगार आपल्या पासून लांब न्हाई आनि व्हो मूर्ख बनतो तो तर मूर्ख ठरतोच पन त्याला मूर्ख करणारा लई महामूर्ख असतोया

बर आता मुलाखत संपलिया, अंन कागुद हातात भेटलाय मला बाबा हिंग्रजी येत न्हाय मंग वाचा बरे त्या कागुदावर काय खरडलंय, तुमच्या कड पाठवतुया त्यो कागुद वाचा अंन मला सांगा म्हाराजा काय हाय ते ! तोवर ६ महीन उलटून गेल्यात अंन म्या दूसरीकड पुन्हा अशा कंत्राटी काम देणाऱ्या कंपनीच्या शोधात जातुया .......................

Sunday, October 31, 2010

व्ह्य म्हाराजा ! आपण निवडून दिलेले सरकार कसा छान कारभार करती हाय.

व्ह्य म्हाराजा !

आपण निवडून दिलेले सरकार कसा छान कारभार करती हाय, लोक आता हाय हाय करून मरत्यात तरी त्यांस्नी काय बी नाय, मागल्या वर्षी इलासराव मुख-मंत्री झाले अन बिचाऱ्या मुंबैस्नी ताज हाटेलावर अनि गेट मुंबई वर कसाब पाहुण्याने हल्ला केला, आता त्यांचे शेजारी असोकजी आदर्श सोसायटी प्रकरणात अडकले, कारगिल ला पाठवा त्यांना किंवा शहीद झालेल्या जवानांकडे सोपवा मग त्यांस्नी समजेल आपण पैसा कसा खाल्ला अनि कुठून खाल्ला.

त्या इलासरावांनी देखील प्रकरण अंगाशी येईल म्हणून राजीनामा देऊन स्वतचा बचाव केला, असोकजींना यांनेच सल्ला दिला असेल तरच सख्खे शेजारी दिसतात, या अशा पांढऱ्या खादी वेशातील गुंडांना अनि दरोडेखोरांना आपली माणसे मते देतात कशी, काय हिस्सा मिळतो काय सामान्य जनतेला अशा लोकांस्नी मत देऊन मग महागाई कशी कमी नाय झाली, काय घोटाळा काय हाय !

बर, आता हमेरीकेचा होबामा येणार हाय मंग त्याच्या स्वागताची तयारी लई झाक, तो येणार म्हणून आपले पोलीस आता त्यांची चाकरी करणार, रस्ते चकाचक व्होनार, पथारी वाल्यांना हटवणार, दारूच्या बाटल्या फुटणार आणि सगळे भ्रष्ट मंत्री व होबामा चीअर्स म्हननार...आणि सामान्य माणूस त्यांचा म्होर हूब राहून टाळ्या पिटणार, हुम्बैकर (मुंबईकर) तुम्ही बी त्याच आता सगात करा, नवीन मुखमंत्री व्हनारच हाय बुधवारी तो भी यांचाच भाऊबंद व्होनार, आता बगाना काल समदे आपले लाडके नेते दिल्लीतून गायब होते आणि संडे साजरा करत व्होते,  मग चरकले आर देवा पुन्हा मुखमंत्री झालू तर जुने घोटाळे उघडे पडले तर, नका दिल्लीत राहू आणि सोनिया संगत नवीन गेम खेळू तोवर म्हराष्ट्राच व्हतय कल्याण.

मुखर्जी म्हनत्यात आदर्श प्रकरणी समदी कागुद पाहून ह्ब्यास (अभ्यास) करायला पुरेसा येळ पाहिजे आणि चर्चा कराइला पाहिजे, अवो सरकार एक सांगू का आपले शहीद जवान जर सीमेवर हेच म्हनले असते शत्रूला तर तुम्ही शीटावर बसू शकला असता का ? अता ह्ब्यास करायचे वय नाही तूमचे खुर्ची स्वोडा नाहीतर योग्य निकाल द्या, का तुमचा बी पब्लिकने अभ्यास घ्यायला पाहिजे.


म्हाराजा, लोकांस्नी जाग कर रे अता नाहीतर गरीब (मनाने व शक्तीने) जनतेचे हाल अजून व्होनार रे बाबा !

जय जय रघुवीर समर्थ !!!

Friday, October 29, 2010

भारतीयांनो आधी ज्या आपल्या मुख्य भाषा ज्या आहेत त्या ज्याने त्याने आपापल्या राज्याप्रमाणे नीट शिकाव्यात आणि मग इंग्रजीचा उदो उदो करावा !

छपन्न भाषा तितुके ग्रंथ | आदिकरून वेदांत | या इतुकियांचा गहनार्थ | येकचि आहे || श्रीराम

इंग्रजी भाषा बरेच काही शिकवत असेल आणि स्पर्धा युगात आवश्यक आहे परंतु ही भाषा व्यक्तीमत्वात सुद्धा आमुलाग्र बदल घडवून आणते त्यामुळे प्रत्येक जातीतला / वर्गातला समाज जर ही भाषा शिकत असेल तर विचार सुद्धा बदलतील उदा. न्हाव्याचा मुलगा वडिलांचा धंदा सोडून IT मध्ये गेला, चाभांराचा मुलगा इंजिनिअर झाला किंवा शेतकरी च्या मुलाने शेती सोडून नोकरी करायचे ठरवले तर प्रत्येक मराठी माणुस हा सगळा व्यवसाय करणार का ?

मग आपापल्या मातृभाषेचा आधी विचार करा, मातृभाषा ही केवळ अभ्यासक्रमात विषय / भाषा म्हणून न बघता तिचा विस्तृत विचार करा.समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितले आहे "सकळ साधनांचे फळ | ज्ञानाची सिगचि केवळ | जेंणे संशयाचें मूळ | निशेष तुटे ||


तरीही आपण काहीही ज्ञान घेतलेले नाही. बाहेरील देशांमध्ये बरेच जण फिरलेले असतील जे उच्चभ्रू शिक्षित आहेत मग त्यांनी तिथे भाषा प्रेम पाहिलेले नाही का ?

मातृभाषा याचा मुळात अर्थ समजावून घेऊया, मातृ म्हणजे आई - जननी आणि भाषा म्हणजेच वाणी,  आई ही सगळ्यांनाच प्रिय असते ना मग या आईसमान वाणीचा, भाषेचा आपण आदर केलाच पाहिजे, गेल्या काही काळापासुन वृद्ध झालेल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची जशी वाट दाखवली जाते आहे तसेच या मातृभाषेचे होत चालले आहे, हे थांबवा !

अन्यथा पुढील काही काळानंतर मातृभाषा ही सुद्धा जंगलातील वाघ, सिंह यांप्रमाणे नष्ट होऊन जाईल आणि फक्त इंग्रजांनी दिलेली हिंग्लिश भाषा सर्वत्र राहील याचा अजून एक अर्थ होतो तो म्हणजेच इंग्रज लोकांची आपण गुलामी केली आता त्यांच्या भाषेची गुलामी स्विकारायची.

अजून सध्या तरी काही शाळांमध्ये (महाराष्ट्रात) प्रतिज्ञा ही मातृभाषेतच होते आहे आणि राष्ट्रगीत हे हिंदीतच म्हंटले जाते पण आता इंग्रजी माध्यमातील मुले मात्र भारत माझा देश आहे हे मातृभाषेत (अभिमानाने) म्हणूच शकणार नाहीत. शेवटी इंडिया इस माय कंट्री आणि माझा देश आहे यातले वजन आणि अभिमान काही वेगळाच आहे, शाळांनो जाग्या व्हा आणि विद्यार्थ्यांनो जागे व्हा (माणुस हा जन्मभर विद्यार्थीच असतो) आणि सरकार ने पण झोपेचे सोंग सोडले तर बरे होईल !

श्रीराम समर्थ: अतुल्य : भारत आणि तेथील राजकारण व समाजव्यवस्था.......

श्रीराम समर्थ: अतुल्य : भारत आणि तेथील राजकारण व समाजव्यवस्था.......: "लोक लोकसंख्या कमी करणार नाहीत ! बरोबर, मग पुढे हेच होणार महागाई कमी होणार नाही, रस्त्यावरची रहदारी कमी होणार नाही, देशातली बेरोजगारी कमी ह..."

अतुल्य : भारत आणि तेथील राजकारण व समाजव्यवस्था....


लोक लोकसंख्या कमी करणार नाहीत ! बरोबर, मग पुढे हेच होणार

महागाई कमी होणार नाही, रस्त्यावरची रहदारी कमी होणार नाही, देशातली बेरोजगारी कमी होणार नाही व त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मात्र वाढेल, नेते मंडळी त्यांची सत्तेची स्पर्धा सोडणार नाहीत आणि आपण डोळे उघडे ठेवून मतदान करणार नाही व योग्य नेता निवडणार नाही. समाजाची सुधारणा होणार नाही.

बर ! पुन्हा आतंकवाद / दहशतवाद हि अडचण आहेच, ती फक्त जातीयवादाची नसुन प्रत्येकजण स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत राहणार काही षंढ होऊन बघत बसतात.

सर्व सामान्य माणसांचे हेच ! सत्ते विरुद्ध आवाज न उठवता त्याने निडून दिलेल्या सरकार आणि आसपासची जीवन विरोधक होणारी परिस्थिती यातच संपून जाणार.

सहनशक्ती आणि षंढपणा यातला फरक ओळखला पाहिजे आणि राजकारणात नेता निवडून दिल्यावर तो जर देशाचा, शहराचा किंवा गावाचा विकास न करता पैसे खात असेल तर प्रथम आपण त्या नेत्याची चांगलीच भरभराट (भरभराट = गाढवावरून आणि चपलाहार घालून तोंडाला काळा रंग फासून मिरवणूक) घडवून आणली पाहिजे.

पुन्हा यात एक नवीन प्रश्न म्हणजे नेते लोकांना संरक्षण देण्यासाठीच पोलीस / RPF  आणि इतर दलांची नेमणूक केली आहे का ? प्रत्येक नेत्यांनी आपल्या शहराचा आणि गावाचा नीट विकास केला तर जी जनता आहे त्याच्या संतप्त जमावात बदल होणार नाही आणि मग नेते मंडळींना सुरक्षा यंत्रणेची फारशी गरज राहणार नाही नाहीतर काय पोलीस सुद्धा नेते मंडळींना काही अपशब्द बोलल्यास अटक करतात नाहीतर बांबू मारतात. 

गुन्हेगारी हि कमी झालीच पाहिजे त्यासाठी सर्व समाज मनात कोणतीही आढी / मतभेद न ठेवता एकत्र आला पाहिजे, नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा काहीतरी रोजगार या बेकार तरुणांना सरकारने तसेच सर्वांने नीट दिला तर गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल याहूनही नाही झाली तर मग शिक्षा करा कि पुन्हा या वृत्तीने डोक वर केले नाही पाहिजे. नाहीतर काय अजून दुसरा कसाब, हेडली आपल्यापासून लांब नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी सुरु असलेली नेतेमंडळींची स्पर्धा आणि एकमेकांच्या पक्षांचे केलेले कौतुक.

व्यक्तिगत कौटुंबिक वादाचे हे व्यासपीठ नव्हे तो घरी ठेवून समाज हितकारक, निष्ठावान नेता तयार झाला पाहिजे जो खरोखर प्रजेला समान न्याय देऊन उत्तम शासन करेल याउलट छत्रपती शिवाजी महाराजांचा "भगवा" हातात घेवून सत्तेसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न हा त्यांचा आणि भगव्याचा घोर अपमान आहे. 

शिका आणि शिकवा ! अतुल्य : भारत 

Tuesday, October 19, 2010

कसाब, आपण आणि कायदा सुव्यवस्था


सुनावणीवेळी कसाबचा थयथयाट
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - न्यायालयात सतत हातवारे करणारा पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब आज न्यायालयात वकिलाशी बोलू न दिल्यामुळे तणतणत वेब कॅमवर थुंकला. त्याच्या या वर्तनाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे सुनावले. तसेच त्याची मर्जी असेल तर त्याने सुनावणीला यावे असेही ऐकविले. 
न्या. रंजना देसाई व न्या. आर. व्ही. मोरे यांच्या खंडपीठापुढे कसाबच्या फाशीच्या शिक्षेसंबंधीच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कसाबला ऑर्थर रोड कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर केले जाते. आज सकाळपासूनच तो कारागृहातील पोलिसांबरोबर हुज्जत घालताना आणि मध्येच गाणी म्हणताना दिसत होता. मध्येच त्याने, न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची मागणी न्यायालयाकडे केली. दुपारी दोन्ही न्यायमूर्ती उठल्यानंतर कारागृहातून पोलिस निरीक्षक काकडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून सांगितले की, कसाबला त्याच्या वकिलांशी बोलायचे आहे. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, येथे बोलता येणार नाही, घेऊन जा त्याला, असे सांगितले. यावर भडकलेल्या कसाबने आरडाओरड केला आणि वेब कॅमवर थुंकला. दुपारच्या सत्रात याबाबतची तक्रार निकम यांनी न्यायालयाकडे केली. दरम्यान, कसाब एकटा राहत असल्यामुळे तो संभ्रमित झाला असावा, असे वाटते, अशी प्रतिक्रिया त्याचे वकील अमीन सोलकर यांनी दिली.

सुरक्षेच्या कारणामुळे तुला न्यायालयात उपस्थित करणे शक्‍य नाही, त्यासाठीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली आहे, असे न्या. देसाई यांनी कसाबला सांगितले. तरीही कसाबचा तोरा कमी होत नव्हता. माझ्यावर काय आरोप आहे? मला न्यायालयात का नेत नाही? मग अमेरिकेला पाठवून द्या, अशी विधाने करीत तो निघून गेला. त्याच्या या वागणुकीबाबत त्याच्या वकिलांनी त्याच्याशी बोलावे, असे खंडपीठाने सांगितले. ही काही खटल्याची सुनावणी नाही. त्यामुळे आरोपीबरोबर आम्ही बोलायला हवे असे नाही. रिवाजाप्रमाणे फाशीच्या शिक्षेत आरोपीची उपस्थिती आवश्‍यक असते. त्यामुळे त्याला हजर केले आहे. जर त्याची इच्छा नसेल तर त्याला सुनावणीला आणू नका, कारागृहातच ठेवा, असे आदेश न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना दिले. निकम यांनी आज कामा रुग्णालयातील व बाहेरील गोळीबारासंबंधीच्या साक्षीदारांबाबत युक्तिवाद केला.

कसाब काय म्हणालान्या. - क्‍या आप सुन सकते हो?
कसाब - सुन सकते है बहोत अच्छी तरह से...
न्या. - आप आराम से सुनवाई देख लेना, पुलिस को तंग मत करना, शाम को आप के वकील आपसे मिलेंगे।
कसाब - यहां कोई फॅसिलिटी नही दी है, आप देख सकते है, किस बात की सुनवाई चल रही है? मुझे बाहर की हालत से वाकिफ क्‍यो नही किया जा रहा है? आप जानते है क्‍या?
न्या. - शाम को आप के वकील आप से बात करेंगे।
कसाब - नही, मुझे यहॉं नही आना, मुझे अमेरिका भेज दिजीए... 
आपण सर्वांनी वाचलीच असेल, या भारत भूमीत प्रथम अतिरेकी कोण हा प्रश्न पहिला तर यात आपण सर्व सुद्धा मोडू शकतो कारण इतके दिवस त्या हरामखोरावर खटला चालू असून देखील कायदा आणि सुव्यवस्था तसेच भारत सरकार यांचा जावई किंवा अक्षरशः मुलगा असल्या सारखे त्याची काळजी घेतात परंतु कोर्टाचा निकाल काही लागला तरी कॅमेरा वर थुंकला म्हणजे बापाचा तोंडावर थुंकला नाही का, मग आता तरी त्याच्या बापाने कडक कारवाई करणे अपेक्षित नाही का ? का पुन्हा सापाला दुध पाजून स्वतः त्याचाकडून दंश करून घ्यायचा आहे का?   
अरे आता तरी जागे होऊ या, का आपल्या कामात, संसारात आणि खासगी आयुष्यातून आपला देशाकरता आपल्या शहराकरता काहीच का करायची इच्छा नाही का? आपण सर्व हिजडे आहोत का निव्वळ घरात बसून पेपर अथवा बातम्या लाऊन बसायचे आणि चर्चा करायची फार बिकट परिस्थिती आहे देशाची, पण हे विसरायला नको कि त्यात आपला पण हातभार आहे, राष्ट्र याकरता काहीच करायचे नसेल तर निव्वळ भारतीय नागरिकत्व आहे म्हणून आणि इथे जन्माला आलो म्हणून निवास करायचा आहे का? फार वेळ नाही मागत आपला देश कारण आपली लोकसंख्या मात्र सर्वांना माहित आहे तेव्हा विचार न करता कार्याला लागणे महत्वाचे.....
जय जय रघुवीर समर्थ !!

thambvaa

बेगने 'जिहाद'साठी युवकांना प्रवृत्त केले
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील संशयित हिमायत बेगने देशाच्या विविध क्षेत्रांत जाऊन तरुणांचा गट तयार करणे व जिहादसाठी युवकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. स्फोटाच्या या मॉड्युलमध्ये अतिशय संवेदनशील माहिती व मुद्दे समोर येऊ लागल्याने दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या मुळाशी जाऊन माहिती घेण्यास सुरवात केल्याचे आज न्यायालयात सांगितले. त्यासाठी हिमायत बेग याची येत्या 25 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. 

बेगला आज नाशिकच्या न्यायालयात हजर केल्यावर या स्फोट व खटल्याशी संबंधित विविध माहिती न्यायालयात ऍड. अजय मिसर यांनी सादर केली. त्यानुसार बेग 2008 मध्ये श्रीलंकेत गेला होता. विविध शहरांना त्याने भेटी दिल्या. त्याचा उद्देश काय होता हे स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यासाठी त्याला लष्करे तय्यबाने पैसे पुरवले होते. नाशिकसह नागपूर, मुंबई व अन्य शहरांनाही त्याने भेटी दिल्या होत्या. त्यामुळे या शहरांत त्याने काय पाहणी केली व उद्देश काय होता याची माहिती संकलित करायची आहे. ज्या दिवशी 7 सप्टेंबरला बिलालला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली त्या दिवशी दोघांत सुमारे तासभर मोबाईलवर संभाषण झाले होते. त्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यातून कदाचित संवेदनशील माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. मोड्युल म्हणून भारतात दहशतवादी कारवायांचे जाळे पसरविण्यासाठी हिमायत लष्करे तय्यबातर्फे युवकांचे जाळे तयार करण्याचे व त्यासाठी त्यांना जिहादची माहिती देणे, प्रवृत्त करण्याचे काम करीत होता.