Wednesday, January 26, 2011

श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण = भाग २


जनमानसात संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ-तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत पंचक घर करून बसले आहेत। ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव आणि तुकोबारायांच्या अभांगाच्या गाथा या पाच ग्रंथाना मराठी भाषेचे पाच वेद म्हणून ओळखले जातेय. पाचही ग्रंथात आढळणारी फार मोठे वैचारिक साम्य व एकवाक्यता आहे. त्यातील काही उदा.
१) जग मिथ्या आहे
२) प्रपंच दु:खमय आहे
३) मन वासनात्मक आहे
४) शरीर मर्त्य आहे
५) वासनेमुळे मनुष्या पुन:पुन्हा जन्माला येतो
६) मोक्ष म्हणजे निर्वासन होऊन पुनर्जन्माच्या चक्रातुन स्वता:ची सुटका करून घेणे
७) त्यासाठी दिर्घकाळ साधना करावी लागेल
८) मनापासून भक्ति केल्यास भगवंताची प्राप्ती होऊन माणूस एकाच जन्मात मुक्त होऊ शकतो
९) मनाने साधना केल्यास भटकंती होऊ शकेल म्हणून सदगुरूची आवश्यकता आहे
१०) मनुष्य मूळता: ब्रम्हस्वरुप आहे
११) ब्रम्ह अनादी आणि अनंत आहे
१२) एकदम ब्रम्हाची धारणा करता येत नसल्यास ईश्वर ही संकल्पना स्वीकारावी
१३) ईश्वर सगुण आहे आणि ब्रम्हाप्रमाणे निर्गुण देखील आहे
१४) एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात वास करून आहे
१५) कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती एकाच परमात्म्याला प्राप्त होते
१६) विविध साधना पद्धतीमधे भेद किंवा अंतरविरोध नसून ती माणसांच्या स्वभावानुसार केलेली सोय आहे
१७) कर्म, भक्ति ज्ञान आणि योग यापैकी कोणत्याही एका मार्गाने माणूस साधना करून मुक्त होऊ शकतो
१८) मुक्त होण्यासाठी आसक्ती, ममत्व वासना या गोष्टींचा त्याग करावा लागतो
१९) मोक्षासाठी विहित कर्म सोडण्याची गरज नाही.
२०) प्रत्येकाने वर्णव्यवस्थेनुसार आपापले कर्म करावे.
राजवाडेंनी लावून दिलेले भांडण- : 
१९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या ५ संतांचे वारकरी आणि धारकरी किंवा प्रवृत्तीवादी आणि निवृत्तीवादी असे वर्गीकरण कुणीही केलेले नाही। परंतु इतिहासाचार्य राजवाडेनी एक लेख लिहीला व समर्थ रामदास हेच खरे संत आहेत तर 'ज्ञानेश्वर ते तुकाराम' हे वारकरी संत केवळ टाळकुटे होते असा विचार मांडला, वास्तविक पाहाता राजवाडे यांचा हा लेख अतिशय बेजबाबदारपणाचा होता। पण त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रचंड वैचारिक वादळ निर्माण झाले व साहित्यिक क्षेत्रातील वातावरण अंत्यंत दुषित झाले. वारकरी आणि धारकरी असे दोन गट पडले .वारकर्यांनी समर्थाना मग सकल संत गातेतून वगळले. नंतर मग हे दोन गट कसे भिन्न आहेत याचे विपुल लेखन घडले परिणामी त्या दोन गटातील दरी वाढतच गेली. त्याने एवढे विकृत स्वरुप घेतले की समर्थांची ओवी जर उचारली गेली की काही वारकरी मंडळी टाळ खाली ठेवून कीर्तन बंद पाडीत. स्वता: समर्थनी आपल्या संप्रदायला धारकरी असे म्हंटले नाही. रामदास-तुकाराम भेट ही झालेली. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात समर्थ रामदासनी स्थापन केलेला मारुती आज ही उभा असून त्याच्या दगडी भिंतीवर "शरण शरण हनुमंता तुज आलो रामदूता" हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. जर त्यावेळी वारकरीमधे समर्थाना मनाचे स्थान नसले असते तर मग तिथे हनुमान मंदिर त्याना बंधाता आले असते का? रामदास व तुकाराम या संतानी एकमेकांचे प्रशंसा करणारे अभंग लिहिले आहेत। समर्थ रामदासानी इतर ही वारकरी संतांचे गुणगान गायले आहे त्यात अगदी आरत्यांचाही समावेश आहे.
समर्थ रामदास कृत आरती व स्तवन : 
प्रती संत ज्ञानेश्वर-
कलियुगी त्रसूनी गेले सज्जन भवऊष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृषणे
तोशविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेने निरसुनी गेले अज्ञान
जयदेव जयदेव जय ज्ञान देवा मंगल आरती करतो दे तव पद ठेवा
दासांचा सारथी म्हणवुनी मी तुजला बाहता दिंडायाला न पावसि का मजला
नुल्लन्घिशी या माते अज्ञविपीन माजला दास म्हणे मम जीव हा तघोंगो बुजला 
प्रती श्री सकल संत - 
निवृत्ती सोपं ज्ञानेश्वर मुक्ताबाई चांगदेव दोघे सुरदास रामदास पाहो
विमळानाद सुखानंद मिराबाई सद्भव
धना सेना कबीर प्रमानंद मेहॉ
पंपदास सज्जन कृष्ण चरचारी
तुलसी नारा नामा विठा वसुरी
जासवन्त गांगल पाठक मुदग ल नरहरी
खेचर जोगा नागा आष्टा बॅहिरो दिंगरी
अलखीदास झाल्हण मनदास रेणुका नंदन
कांपर कूर्मडास आणता गोरा धुंदी जनार्दन
केशवडास चंगा परसोवा नायक पदामण्कको
सुदामा सवता अच्युत एको जनार्दन्
प्रती तुकाराम- 
धन्य धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दिप लागे धन्य निसपरुहता एकविध निष्ठा
श्रुतीभाव स्पष्टा दाखविसी संतोषाले चित्त होताची दर्शन
कॅलो आली खून अवताराची घाटाल्से धडा नामाचा पै गाधा
प्रेमे केला वेडा पांडुरंग नववीधा भक्ति रढविली जगि तारु कलियुगी दास म्हणे
संत तुकाराम महाराज कृत समर्थ स्तवन - 
का स्ताविशी माते दुर्बळ पतिता नामितो समर्था पाय तुझे ब्रम्हाज्ञ ब्राम्हण वैराग्य पुतळा
रामभजनी लीला अनुपम्य त्रेतायुगी स्वामिसेवा केली भारी श्री रामावतारी महरुद्रा हे आम्हा कळले स्वामींच्या प्रतापे
वाडलो पायपे समर्थांच्या असावी ते कृपा समचरणी दृष्टी वितेवरी गोमती वृत्ती राहो भक्तासे दिन स्वामिंची करुण
विट्ठ्ल किर्तना प्रेमा रहो तुम्हा संताणलागी मगतासे एक तुका म्हणे सुख संतापायी
दोन संत एकमेकांचे द्वेष करीत नाहीत मात्र अनुयायी भांडत असतात दोन साहेब कार्यालयात गप्पा मारीत असतातपण त्यांची कुत्री मात्र एकमेकांवर भूंकत असतात। तस हा प्रकार झाला।
मागे एकदा प पु बाबा महाराज सातारकर म्हणाले होते की -
"मदास की ज्ञानेश्वर ते तुकाराम हा वाद साहित्यिकांमधला आहे. तो सांप्रदायिकांवर लादु नका. कोणत्याही सांप्रदायिक वारकर्‍याने समर्थन नावे ठेवली नाही किंवा समर्थंच्या गडावरील मंडळीनी ज्ञानदेवाना नावे ठेवली नाहीत. जे नावे ठेवणारे आहेत त्याना परमार्थ कळालाच नाही. त्यांचा विचार करण्याचे कारण नाही. तेंव्हा समर्थ व वारकरी सांप्रदायात द्वैत नाहीच."
समाज सुधारकांनी वाढवलेले द्वैत-
महारष्ट्रात वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय आहे संख्येच्या दृष्टीने ही मोठा आहे। या संप्रदायाचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व जतीमधे वारकरी संत होऊन गेले सेना न्हावी, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, नरहरी सोनार, जलोजी आणि तुकोजी पांचाळ हे सुतार, चोखामेळा हरिजन, तुकाराम वाणी तर ज्ञानेश्वर-एकनाथ हे ब्राम्हण. सर्व जातीतील संत असल्यामुळे हा संप्रदाय खेड्या पाड्यात व बहुजन समाजामधे सर्वदूर पोहोचला पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे शक्तीपीठ आणि भक्तीपीठ बनले। अगोदर सांगितलेल्या कारणांमुळे काही वारकरी मंडळीनी समर्थाना न स्वीकारल्याने महारष्ट्रातील संख्येने मोठे असलेल्या भक्तांकडून समर्थ दूर गेले। वारकरी संप्रदायात बहुजन समाज जास्त असल्यामुळे बहुजन समाज आणि समर्थ यांच्यात एक दुरी निर्माण झाली.त्याच वेळी सामाजीक क्षितिजावर तथाकथित समाजसुधारकांचा उदय झाला आणि ही परिस्थिती आणखीच बिघडली. त्यानी संताना अकारण वेठीस धरले; जातीव्यवस्थेचे निर्मूलन करत असताना ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी दुही निर्माण केली आणि त्याचवेळी राज्य करीत असलेले ब्रिटीश मंडळीनी या वादाला खतपाणी घातले.काहीनी तर अगदी मोगल राज्यकर्त्यानी हिंदुंवर केलेल्या अत्याचाराचेही समर्थन केले. इस्लामी राजवटीला विरोध करणारे - छ्त्रपती। शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामीपैकी शिवरायांच्या वाटेला जाणे परवडण्यासारखे नव्हते म्हणून मग राहीले ते समर्थ ते ब्राम्हण।म्हणजे त्यांच्यावर टीका म्हणजे बहुजन समाजास खुश करणे.आणि बनवून टाकले समर्थाना ब्राम्हणांचे पुढारी.
स्वामी विवेकानंद म्हणतात- 
"धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही. कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही. किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना असून त्यांचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।" धार्मिक क्षेत्रात सर्वच संतानी सामाजिक समता प्रस्थापित केली आहे. " हिंदू धर्ममधे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत . " चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश: "याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.आणि भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण- ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।
गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण, व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र् . स्वामी विवेकानंद म्हणतात, "मला अश्या प्रकारची समाजव्यवस्था हवी आहे जिथे शंकराचार्यांचा मेंदु असेल, महंमदाची समता असेल,बुद्दाची करुणा असेल आणि कॄष्णाचे चातुर्य असेल।" संतानी भक्तिच्या क्षेत्रात समता आणण्याचा प्रयत्न केला; समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यानी कधीही बंड पुकारले नाही। हा संतांचा दोष नसुन सामाजिक मानसिकतेचा आहे.स्वामी विवेकानंद केवढे मोठे क्रांतिकारक संत पण ते दक्षिणेश्वराच्या काली मातेच्या मंदिरातील देवीला बोकड बळी देण्याची प्रथा बंद करु शकले नाही किंवा भगिनी निवेदिता यांना ते काली मातेच्या मंदिरात दर्शनाला नेऊ शकले नाही तुकाराम महाराज हे वेद व शास्त्र यांचे कडवे अभिमानी होते। ते म्हणतात-" वेदा निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ १३४५॥ " . प्रत्येक संताला कोणत्या ना कोणत्या जातिच्या माणसांनी त्रास दिला आहे पण संतानी कधी त्याला जातीयतेचा रंग दिला नाही. शिकागो धर्म परिषदेवरुन आल्यावर विवेकानंदाना जगन्नाथपुरीच्या पुजार्याने मंदिर प्रवेश नाकारल्यावर जर त्यांनी लोकाना भडकावुन दिले असते तर आपण विचार ही करु शकत नाही. ते आपल्या गुरुबंधुला लिहिलेल्या पत्रात म्हणतात - "मी जगाकडुन खुप सन्मान स्विकारले आहे आता निंदा देखिल सहन केले पाहिजे" । पंतप्रधाना असतानाच ईंदिरा गांधी याना देखील मंदिर प्रवेश नाकरला गेल्यावर जर त्यानी मनात आणले असते तर त्या पुजार्याला कामावरुन काढुन टाकले असते. पण केवळ सुसंस्कॄतपणा म्हणुन त्यांनी त्या पुजार्याला सोडुन दिले.
समर्थ रामदास जातीयवादी ??
-समर्थ म्हणतात- "मराठा तितुका मेळवावा" म्हणजे त्याना मराठा समाजबद्दल अभिमान असावा , "भेटो कोणी नर । धेड, महार वा चांभार । जाणावे अंतर । या नाव भजन ॥" म्हणजे त्याना बहुजन समाजाबद्दल ही बराच कळवळा होता. ब्राम्हणाबद्दल, ब्राम्हणांच्या सोवळ्याबद्दल बोलताना ते म्हणतात - "सोवळे कोणते रे । ब्राम्हणा ओवळे कोणते रे ॥" म्हणजे ते पक्के ब्राम्हणद्वेष्टे होते हे सिद्ध होते. पण आजकालचे स्वयंघोषित पुढारी त्याना मात्र ब्राम्हणांचे पुढारी का ठरवू पहात आहेत कोण जाणे ? ज्या प्रमाणे वकिल लोक आपल्या प्रतिस्पर्धिचे कुठले तरी वाक्य आणुन त्याचा मनमानी अर्थ लावुन त्याला नाही नाही ते आरोप चिटकवतात तसे हे कावळ्याची नजर असलेल्या पण साहित्यिकाची आव आणणारया लेखकांनी समर्थांवर आरोप करुन स्वत:ची घाण त्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला आहे. काविळ झालेल्याला जसे सगळिकडे पिवळे दिसत असते तसे त्या लोकांना सतत समर्थ द्वेषच दिसतो॥ शेवटी - "तो काक पक्षी । क्षते परिक्षी । क्षतेच लक्षी" हेच खरे.
समर्थांचे शिष्यगण
यात इतर बहुजन वर्गही जास्त होता - धोंडिबा धनगर, दत्ता न्हावी, बाजी गोसावी, वली महंमद, फाजलखान ई.वली महंमद तर मराठवाड्यातील मठांचा प्रमुख होता. महात्मा गांधी जेंव्हा नेतृत्व करित होते तेंव्हा सर्व प्रांताचे पुढारी हे ब्राम्हण होते पण म्हणुन कांही ते ब्राम्हणांचे पुढारी होवु शकत नाहीत. परवाच वारलेले श्री। नानासाहेब धर्माधिकारी यांचे १ कोटी शिष्य गण आहेत. त्यानी आयुष्यभर दासबोधाचे निरुपण केले. तसेच त्यानी शेकडो निरुपणकार बनवले त्यात अगदि भांडी घासणार्‍या स्त्र्यियांपासुन ते भाजी विकणार्‍या मायेपर्यंत लोक आहेत. मुठभर शिष्यांचे काम बगुन जर समर्थाना दोष देणार असाल तर मग आज महापुरुष म्हणवुन घेतले जाणार्यांचे काय्? त्यांच्या शिष्याने केलेली कु-कर्मे त्यांच्यावर कसे थोपवता येते?
एक घटना -
राज्याभिषेक समयी शिवरायांना २०० हिंदुंचे शुद्धीकरण करायचे होते पण तत्कालीन समाजातील सनातनवाद्यांमुळे ते शक्य झाले नाही पण वैयक्तिक जीवनात त्यानी नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू धर्मात आणले. जर कोणी उद्या उठुन असे म्हणाला की २०० लोकाना शिवरायांनी दिलेल शब्द फिरवला तर ते मुर्खपणाचे ठरेल. छ.शाहुनी मराठा समाजतील शंकराचार्यांचे पीठ ही बनवले व भिक्षुक निर्माण करण्याचा ही प्रयत्न् केला पण खुद्द् मराठा समाजानेच ते नाकारले.. ( पण आज तेच मराठे आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत काय दुर्दैवविलास आहे पहा.)
तुकाराम महाराजांचा खुन होतो ब्राम्हणाकडुन, ते झाकण्यासाठी ते वैकूंठ ला गेले अस अपप्रचार ब्राम्हण करतात असा ही आरोप होतो... तुकाराम महाराजांचा खुन होतो व तेही केवळ १२ मैल दुर असलेल्या पुणे इथे राहणार्या शिवरायाना देखिल कळत नाही जिथे शिवरायांचा साम्राज्य आहे . अशाप्रकारे हे केवळ तुकारामांचाच नव्हे तर छ।शिवरायांचा देखिल अपमान करीत आहेत. अफजलखानचा वकील हा ब्राम्हण होता म्हणुन त्याचा राजकारण करणारे हे मुद्दाम लपवतात की अफजलखानच्या सैन्यात कित्येक मराठी सरदारच नव्हे तर शिवरायांचे नातेवाईक ही होते. एवढेच काय छ्.शंभुराजे औरंगजेब शी लढत असताना शिवरायांचे सहा जावई संभाजी राजांविरुद्द् लढत होते. एका शिखांने इंदिरा गांधींची हत्या केली तर ते विसरले जाते पण एक ब्राम्हणाने म।गांधींची हत्या केली हे मात्र ६० वर्षे झाली तरी विसरले जात नाही। मतांसाठी शिखांची माफी मागितल जात पण ब्राम्हणाना झोडपल जात।
शिव-समर्थ पत्रे -
दोन्ही महापुरुषांनी एकमेकास लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.
१) १६४९ ला समर्थांनी शिवरायांस लेहिलेल पत्र
2) १५ ओक्टोबर १६७८ ला शिवरायानी समर्थास लिहिलेल पत्र ( चाफळ ची सनद )
३) १६८१ शिवरायांच्या अकाली निधनानंतर संभाजीना लिहिलेल पत्र
४) १३ जानेवारी १६८२ ला संभाजी राजाना केलेला उपदेश.
इतकेच काय शहाजी राजे व समर्थांचा भेटीचा कागद आजही तंजावर येथिल मराठी ग्रंथालयात 'भोसले रुमाल' या बाडात उपलब्ध आहे.
शिव-समर्थ भेट -
पहिली भेट चाफळ पासुन २ मैल अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे झाली. ( सन १६४९ ,१२ एप्रिल) दुसरी भेट शिवथर घळ इथे १६७६ साली. शिवरायांच्या चरित्रात तुकाराम महाराजांचा जास्त उल्लेख येत नाही याचे कारण तुकाराम महाराज जेंव्हा वैकुंठला गेले त्यावेळी शिवराय हे केवळ १९ वर्षाचे होते. या उलट समर्थ हे महाराजांच्या निर्वाणानंतर दोन वर्षानी समाधिस्त झाले त्यामुळे संपुर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले. बाबा महाराज सातारकर म्हणतात की - "तुकाराम व समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते हे कोणीही नाकारु शकत नाहीत"
शिवराज्याभिषेक व समर्थांची अनुपस्थिती-
अनेकदा शत्रु गंमत पाहण्यासाठी व फोडझोड करण्यासाठी उपस्थित असतात. राज्याभिषेकाला इंग्रज अधिकारी देखिल आले होते ते काय फार प्रेमाने नव्हे. तो राजनितीचा एक भाग असतो. म्हणुन मग काय समर्थ व शिवराय यांची भेटच् झाली नाही असे म्हणणे कितपत बरोबर हे तुम्हीच ठरवा. प्रभु रामचंद्राच्या जडणघडणित विश्वमित्रांचे स्थान अबाधित आहे पण राम-राज्याभिषेकावेळी ते कुठे उपस्थित होते? मग असे म्हणणार का त्यांची भेटच झाली नाही?
सांप्रदायिक चरित्रकारांच्या चुका -
राजा पेक्षा प्रजा अधिक राजनिष्ट म्हंटल्या प्रमाणे समर्थांनी कधिही स्वत:कडे स्वराज्य स्थापनेचे श्रेय घेतले नाही. पण काही शिष्यानी हे तत्त्व न पाळुन समर्थाना श्रेय तर शिवरायाना केवळ आज्ञाधारक बनवुन टाकले. हिंदवी स्वराज्य़ स्थापनेची प्रेरणा मातोश्री जिजाबाईंची तर सर्व मेहनत शिवरायांची होती यात काही वादच नाही. एकाद्या आमदाराचे किंवा एकाद्या खासदाराचे निर्णय हे जसे पुर्ण पक्षाचे होवु शकत नाही किंवाएकाद्या स्वय़ंसेवकाचे निर्णय जसे संपुर्ण संघाचे निर्णय होत नाही तसेच एका शिष्याचे चुक ही संपुर्ण संप्रदायची होवु शकत नाही. राजकारणात खर्‍या राजकारणाचे कागदपत्र उपलब्ध नसतात. जे उपलब्ध असतात ते राजकारण नसतात तर ते प्रशासनाचे भाग असतात. "राजकारण बहुत करावे । परंतु कळोचि न द्यावे ।"
अफजल खानाच्या आगमनाची गुप्त सुचना देणारे पत्र-
विवेके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणून
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोचिं नये॥१
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या अंगी
रघुवीरकृपा ते प्रसंगी
दासामहात्म्य वाढवी॥२
रजनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार
घालिताती येरझार।लाविले भ्रमण जगदीशे॥३
आदिमाया मूळ भवानी।
हेचि जगाची स्वामिनी।

येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥४॥
विजापुरचा सरदार निघाला आहे.

असा स्पष्ट संदेश त्यात मुद्रीत झालेला दिसतो. खान निघाल्याची खबर देणार पत्र
डेमिंग या इंग्रज इतिहासकाराचे एक प्रसिद्द वाक्य आहे - " Shivaji and Ramdas were two bodies but one soul"
अन्य कांही आक्षेपांचे खंडन -
१) लग्न मंडपातुन पळुन गेल्या मुळे एका स्त्री वर अन्याय
- त्या स्त्रिचे त्याच लग्न मंडपात दुसर्या मुलाशी लग्न लावुन देण्यात आले। त्यामुळे त्या स्त्री वर अन्याय झाला असे म्हणालात तर ते कसे खरे मानायचे? २) तुकारामानी "भिक्षापात्र अवलंबविणे । जळो जिणे लाजिरवाणे" असे म्हणाले व समर्थ संप्रदाय हा भिक्षेवर अवलंबुन आहे त्यामुळे ते ( तुकाराम ) समर्थविरोधी होते
- पण स्वता: तुकाराम महाराजच काय आज देखील वारकरी मंडळी पंढरपुर ला वारीला जात असताना भिक्षेचा आश्रय घेत असतात ३) समर्थानी जे लिखाण केले ते कारकुनी होते
- समर्थ हे साहित्यिक होते असे प्रशस्तीपत्रक कुणा लुंग्यासुंग्या कडुन घेण्याची काहिही गरज नाहीये। नराधमांचे विद्रोही साहित्य संमेलन- नावालाच विद्रोही पण काम मात्र हे संत व देशद्रोही करत आहेत। समर्थ रामदासच नव्हे तर संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्यावरही हे विद्रोही घसरले। स्वामी विवेकानंद म्हणतात - " द्वेषावर आधारेत कार्य जास्त दिवस टिकत नाही।"
आता गाडी इतरांवरही -
इतके दिवस रामदासांवर बोंबलत असलेली मंडळी आता हळुह्ळु ज्ञानदेवांवर घसरत आहेत। जाहीर सभेंमधुन ते सांगत आहेत की, - ग्यानबा-तुकाराम म्हणण्या ऐवजी नामदेव-तुकाराम म्हणा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
तर- झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे
- तर लोकमान्य टिळकांना या लोकांनी ' भटमान्य' असे म्हंटले आहे
इतिहासाच्या अभ्यासाला जातियवादाचे ग्रहण - 
आजचे हे तथाकथित इतिहासकार फक्त जातिवरुनच इतिहासाचे एकांगी लिखाण करित आहेत। त्यातुन मुर्ख सरकार असले कि झाले वाट लागणारच या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे या वादातुनच मग दादोजी कोंडदेव पुरस्कार वाद तर कधी सरस्वतीपुजन वरुन वाद होतात ।
समर्थांच्या चारित्र्याची चर्चा - 
नागपुरच्या माकडाने मर्कटश्री मा म देशमुख समर्थांसारख्या महापुरुषाच्या चारित्र्यावर शितोंडे उडवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 'अध्यात्मात वस्त्र् देणे' हा वाक्य प्रचार आहे हे या मुर्खाना कधी कळणार? सुफी संप्रदायात देखिल स्त्रियांचे वस्त्र अंगावर परिधान करुन देहबुध्दि संपल्याचे दाखविण्याचे एक संकेत आहे. या मुर्ख विद्रोहीनी गिरिधर स्वामींची मुळ ओळी न देता एका ओळिचा आपल्याला हवे तसे अर्थे घेवुन दळभद्री आरोप समर्थांवर करावे या सारखा विनोद शोधुनही सापडणार नाही. शेवटी काय मनी वसे ( विद्रोहींच्या ) ते स्वप्नी ( मुखी) दिसे एकाद्या ग्रंथातील शेकडो प्रतिकुल संदर्भ सोडायचे व एकाद्या प्रसंगाचा मनमानी अर्थे लावयचा व वर इतिहास संशोधकाचा आव आणयचा हे म्हणजे - शेळीने वाघाची कातडी पांघरुन स्वता:ला वाघ म्हणून घेण्यासारखे आहे. न र फाटक यांचे एक वाक्य घेवुन वाद माजविणारे त्यांनी समर्थांचा शेकडो वेळा केलेले कौतुक मात्र लपवायचे असे का? शेवटी काय या मुर्खांकडुन समर्थांसाठी प्रशस्तिपत्रक घेणे म्हणजे एकाद्या वारंगनेकडुन प्रतिव्रतेने प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होइल किंवा गटारीकडुन गंगा पवित्र असल्याचा प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होय.
शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडे दुष्काळ.
डॉ.हेडगेवार सरसंघसंचालक असताना संघाच्या शाखेंवर प्रार्थना संपली म्हणजे "राष्ट्रगुरु स्वामी रामदास की जय" असे म्हणण्याची पद्दत होती शेवटी समर्थांचा शिवरायांवर केलेला काव्य देत आहे. जे फ़क्त मराठी मनात च नव्हे तर सर्व शिवभक्ताना प्रिय आहे -
" निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितिचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ "
" शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा साक्षेप ॥
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी
त्याहुन करावे विशेष । तरिच म्हणावे पुरुष
या उपरी आता विशेष । काय सांगावे? ॥ "
मला वाटते वरील माहिती वाचल्यावर एकादा अभ्यासु माणुस नक्किच विचार करेल व खरे-खोटे काय ते जाणून घेईल.

ज्वलंत हिदुंत्व याच्या दुव्यातुन ...
-सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’ या पुस्तकाचा संक्षेप)
   

शिव-समर्थ भेट, आक्षेप व खंडन





श्रीराम ! 

आज बरेच दिवसांनी या ठिकाणी लिखाणासाठी यावे लागले. त्यास कारण हि असे कि सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जो ब्रिगेड अथवा सत्यशोधक संघटना चालवली जात आहे त्यात जो ब्राह्मण द्वेष चालू आहे त्याबद्दल काही ब्रिगेडीनां सांगावेसे वाटते. समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य संपूर्ण देशाला माहित आहे असे म्हणणे आणि न म्हणणे दोन्ही चुकीचे राहील. कारण ज्यांना माहित आहे अथवा ज्यांनी समर्थ रामदास स्वामींचे समग्र साहित्य, ग्रंथ वाचन केले आहे तो असे बिनबुडाचे आरोप करणार नाही आणि ज्यांनी पहिले वा वाचेलेच नाही त्यांस काय कळणार. यावर स्वत: समर्थ रामदास स्वामी म्हणतात " समूळ ग्रंथ पाहिल्याविण | उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण | पाहे तो येक पढतमूर्ख ". मुळात त्याकाळातील तत्कालीन परिस्थिती न पाहता, न अनुभवता आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे. शिव समर्थ भेट सुद्धा कधी जाली नाही असे यांचे म्हणणे आहे यावर अभ्यास करून पुढील माहिती मिळते.

समर्थ रामदास स्वामी आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला पत्र-व्यवहार फार मौलिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी कळवलं की, समर्थ रामदास आपल्या खोर्‍यामध्ये आलेले आहेत. चाफळखोर्‍यात त्यांनी राममंदिर बांधलेले आहे. तू त्यांची भेट घे आणि त्यांची मदत घे. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी म्हणून चाफळला आले. समर्थ रामदास तिथे नव्हते, त कुठेतरी भिक्षेकरता निघून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा माणूस नरसोमालनाथ अंबरखाने यांनी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याच समर्थ रामदासांना नंतर सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटू इच्छितात हे कळल्यावर समर्थ रामदासांनी चौकशी केली, की सध्या महाराज कुठे आहेत. महाराज वाईला आहेत ही कळलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सुंदर पत्र समर्थ रामदासांनी लिहिलं आणि समर्थ शिष्य दिवाकर गोसावी बरोबर वाईला पाठविलं.

या पत्राबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणत असत कि समर्थ रामदासांनवरती अफाट काव्य निर्माण झाले, छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणार्‍या कितेक कविता तयार झाल्या परंतु समर्थ रामदासांनी या पत्रातील काव्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे वर्णन केलेलं आहे तास वर्णन आपल्याला कोणत्याही काव्यात पाहायला मिळत नाही. पत्रात समर्थ रामदास लिहितात,

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या वेळी जे पत्र पाठविले आहे, त पण मौलिक आहे. या पत्राचे वैशिष्ठ म्हणजे कि पत्राच प्रत्येक ओळीच पाहिलं अक्षर जर घेतल तर "विजापूरचा सरदार निघाला आहे" अशा प्रकारची सूचना मिळते.
अफजल खानाचा सगळा मार्ग जर आपण पहिला तर पंढरपूर, म्हसवड, फलटण नंतर वाई, हा सगळा रस्ता जो आहे. या सगळ्या रस्त्यात जोगोजागी समर्थ रामदासांचे मठ आहेत.

वाई परिसरात समर्थ रामदासांचे कमीतकमी दहा मठ आहेत. ज्या प्रतापगडावरती अफजल खानाला मारलं त्या प्रतापगडावर समर्थांचा मठ आहे. तिथून पाच मैलावरती पारगाव खंडाला आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे. पसरणीचा घाट आहे त्या पसरणीला समर्थ रामदासांचा मठ आहे. महाबळेश्वरला समर्थ रामदासांचा मठ आहे. महाबळेश्वरहून सातार्‍याला जाताना मेढा मधे लागतं, त्या मेढ्याला समर्थ रामदासांचा मठ आहे. पाचगणीच्याखाली कण्हेरी नावाच गाव आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे.

कण्हेरीपासून दहा मैलावर शिरवळ आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे. अफजल खान येत असल्याची वार्ता या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम समर्थ शिष्य वासुदेव गोसावी यांनी केलेलं आहे, आणि ते सगळ पत्र मोठे गमतीशीर आहे. ते खालील प्रमाणे,

वि॒वेके करावे कार्यसाधन | जा॒णार नरतनु हे जाणून |
पु॒ढील भविष्यार्थी मन | र॒हाटोचिं नये॥

चा॒लो नये असत्मार्गी | स॒त्यता बाणल्या अंगी |
र॒घुवीरकृपा ते प्रसंगी | दासामहात्म्य वाढवी॥

र॒जनीनाथ आणि दिनकर | नि॒त्यनेमे करिती संचार |
घालिताती येरझार। लाविले भ्रमण जगदीशे॥

आ॒दिमाया मूळ भवानी। हे॒चि जगाची स्वामिनी।
येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥

असे पूर्ण सगळं पत्र वाचलं तर सबधं आध्यात्मिक उद्देश आहे. पण पहिली अद्याक्षर पहिली तर “ विवेके करावे कार्यसाधन | जाणार नरतनु हे जाणून ”  " विजापूरचा सरदार निघाला आहे " अशा प्रकारे समर्थ रामदासांनी पत्राद्वारे गुप्त राजकारण केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन ते इतक्या अत्यंत प्रभावीपणे करतात, तितक्याच वाईट विशेषणांनी संयुक्त असं अफजल खानाचे हि ते वर्णन करतात. ते पहा,

तुंड हेंकाड कठोर वचनी | अखंड तोले साभिमानी |
न्याय नीति अंतःकर्णीं | घेणार नाहीं ||३||

तर्‍हे सीघ्रकोपी सदा | कदापि न धरी मर्यादा |
राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||४||

ऐसें लौंद बेइमानी | कदापि सत्य नाहीं वचनीं |
पापी अपस्मार जनीं | राक्षेस जाणावें ||५||     

दहशतवाद्याच वर्णन करावं तस समर्थ रामदासांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे, आणि त्या माणसाशीं राजकीय चर्चा नको.
No political Dialogue; राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||
दहशतवाद्यांशी राजकीय चर्चा करणार्‍या राज्यकर्त्यांनी समर्थ रामदासांच्या या वचनापासून बोध घ्यावा इतंक हे मौलिक वाचन आहे. उलट ते म्हणतात, 

समयासारिखा समयो येना | नेम सहसा चलेना |
नेम धरितां राजकारणा | अंतर पडे ||६||

अति सर्वत्र वर्जावें | प्रसंग पाहोन चालावें |
हटनिग्रहीं न पडावें | विवेकीं पुरुषें ||७||

बहुतचि करितां हट | तेथें येऊन पडेल तट |
कोणीयेकाचा सेवट | जाला पाहिजे ||८||

Kill him. त्याचा शेवट झालां पाहिजे. दहशतवादी चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात, ते ठार मारण्याच्या योग्यतेचे असतात. खान आलेला आहे. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तू त्याला ठार मार. अस समर्थ रामदास या पत्रात स्पष्टपणें लिहितात. भगवान श्रीकृष्णांची राजनीतीची सूत्र या पत्रामध्ये आपल्याला पहायला मिळतात.

आता सांगा ह्या सगळ्या समर्थ रामदासांच्या काव्यावरुन सद्य समाजातील राज्यकर्त्यांनी काय बोध घेतला अथवा हे सर्व न वाचता, न पाहता आरोप-प्रत्यरोप करत आहेत. ह्या सर्वांची लायकी आहे का हे त्यांनी स्वत: तपासावे, कसाब सारखे कित्येक पाहुणे यांचाकडे असतील हे त्यांनाच माहित, परंतु आपण नागरिक हि झोपेत आहोत हे तितकेंच सत्य आहे...

जय जय रघुवीर समर्थ !!!

सौजन्य : समर्थभक्त सुनीलजी चिंचोलकर 

Monday, January 10, 2011

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शहाजी राजेंची भेट !!!



समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शहाजी राजेंची भेट :
अलीकडे तंजावर मठात उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की तपश्चर्येच्या काळात शेवटी शेवटी समर्थांची भेट छत्रपती शहाजी राजे यांचेशी झाली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांमध्ये हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीबद्दल चर्चादेखील झाली होती. इतिहासाचार्य राजवाडे यांनी हि कागदपत्रे अभ्यासली असून त्यानुसार पुढील गोष्टी ध्यानात येतात -

इ.स. १६२८ पासून इ.स. १६३२ पर्यंत नाशिकपासून जुन्नर - संगमनेर पर्यंतचा भाग शहाजी महाराजांच्या अखत्यारीत होता. पावसाळ्यात अनेकदा त्यांच्या सैन्याचा ताल नाशिकमध्ये असायचा. दौलताबादला सुलतानाने जिजाबाईच्या माहेरची चार माणसे कापून काढल्याने शहाजी महाराज नाराज होते. याच काळात जिजाबाईना दिवस गेले होते. पुण्यात राहून शहाजी महाराजांनी आपले स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता; परंतु बाळाराव या मराठा सरदारच्या मदतीने शहाजी राजांचा हा डाव आदिलशहाने उधळून लावला होता. शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामांच्या चाकरीत आले. पण तिथेही असेच कटू अनुभव वाट्याला आले. या बाबतीत इ.स. १६३१ सालची एक भयंकर घटना बोलकी आहे.

शहाजी राजांना एक चुलत भाऊ होता. त्याचे नाव खेलोजी राजे भोसले. तोदेखील निजामशाहीतच नोकरीला होता. त्याची पत्नी सत्यभामा गोदास्नानासाठी नाशिकला येणार होती. त्या काळी राजघराण्यातील एखादी स्त्री गोदावरी नदीवर स्नानासाठी येणार असल्यास त्या परिसरात पुरुषांना प्रवेश मिळत नसे. त्या स्त्रीला कपडे बदलण्यासाठी कापडी पडद्यांचा आडोसा तयार केला जात असे. इ.स. १६३१ साली सत्यभामाबाई स्नानासाठी गोदावरी नदीवर आल्या. त्यांचे स्नान झाले. त्यांनी कपडे बदलले आणि रामकुंडावर त्या दर्शनासाठी निघाल्या. तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. माणसे सैरावैरा धावू लागली. महाबतखान हा निजामातला सरदार भोसले घराण्याचा द्वेष करत होता. असहाय्यपणे धावणाऱ्याबाईना उचलून त्याने घोड्यावर घेतले आणि पळून गेला. या ठिकाणी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की, शहाजी महाराजांसारख्या पराक्रमी सरदाराच्या भावजयीची हि कथा असेल तर सामान्य स्त्रियांच्या व्यथेला कोण वाली असणार ? सत्यभामेच्या आहार्नाची वार्ता कळल्यावर शहाजी महाराज तातडीने नाशिकला आले. सुमारे २ लाख रुपये भरून त्यांनी आपल्या भावजयीची सुटका केली. हे सर्व प्रकरण हाताळण्याच्या निमित्ताने ते दोन महिने नाशिक शहरात होते. त्या वेळी जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावर चिमुकल्या शिवाजीबरोबर राहत होत्या. शिवाजी त्या वेळेस सुमारे दिड वर्षांचा होता. नाशकातील वास्तव्यात समर्थांची कीर्ती शहाजी महाराजांच्या कानावर निश्चित गेली असणार. त्यांचे नाशिकमधील उपाध्याय ढेरगेशास्त्री यांची आणि समर्थांचीदेखील भेट आणि परिचय यापूर्वीच झाला असेल. दुपारी १२ च्या सुमारास समर्थ गुहेतून बाहेर पडतात आणि भिक्षेसाठी पंचवटीत येतात हि माहिती शहाजीमहाराजांना मिळाली असणार. त्यानुसार एक दिवस ते दुपारी समर्थांना भेटायला आल्याची नोंद आहे. त्या डोहांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध नसला तरी समर्थ रामदास स्वामी आणि शहाजी महाराज या दोघांच्या मनात तत्कालीन देशस्थितीचे जे वादळ होते ते लक्षात घेता त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याचा आपण अंदाज करू शकते. या भेटीनंतर काही महिन्यांतच आपले पुरश्चरण संपवून समर्थ भारतभ्रमणाला निघाले आणि भारतभ्रमण संपल्यावर ते नेमके शिवाजी महाराजांच्या जहागिरीत येऊन स्थिरावले.

या घटनेवरून त्यांची आणि शहाजी महाराजांची काय चर्चा झाली असेल ते स्पष्ट ध्यानात येते. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या मते तंजावरच्या भोसले रुमालातील बदंक तीन नुसार एक दिवस शहाजीराजे जिजाबाई आणि बाल शिवाजी यांना घेऊन समर्थांच्या दर्शनाला आले होते. शिवनेरी किल्ला  नाशिकपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे शहाजीमहाराज जिजाबाईनां घेऊन आले असतील हे अगदी स्वाभाविक आहे. माझ्या तर मनात येते कि दीड वर्षांच्या शिवबाने समर्थांनी कडेवर घेण्यासाठी हात पुढे करताच मोठ्या आनदाने झेप घेतली असेल आणि समर्थांच्या मांडीवर बसलेल्या शिवबाला पुन्हा जिजाबाईच्या स्वाधीन करणे शहाजी महाराजांना कठीण गेले असेल. चिमुकल्या शिवबाने आपल्या मुठीत समर्थांच्या गळ्यातले रामदासी वस्त्र घटत धरून ठेवले असेल अन तो समर्थांना चांगलाच बिलगला असेल.

तत्कालीन यवनांच्या अत्याचाराने भोसले आणि जाधव ही दोन्ही घराणी पोळलेली आहेत. सत्यभामेच्या घटनेनंतर शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली; परंतु ते पुन्हा आदिलशाहीत गेले. काळही अनुकूल नव्हता. अशा वेळी शहाजी महाराजांनी आपण आदिलशाही एकनिष्ठ असल्याचे नाटक करायचे आणि जिजाबाईनी बाल शिवाजीला स्वतंत्ररीत्या घडवून त्याच्याकडून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करावयाचे. समर्थांनी जागोजागी मठ स्थापन करून त्या मठातल्या संघटनेने शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यात गुपचूप मदत करायची अशा प्रकारचा काही निर्णय शहाजीराजे आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीत ठरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एरवी भारतभर भ्रमण करणारे समर्थ रामदास स्वामी नेमके महाराष्ट्रातच का स्थिर व्हावेत ? शिवाजी महाराजांच्या जहागीरीतील चाफळ हेच केंद्र त्यांनी आपल्या हालचालींसाठी का निवडावे ?

दासबोध लेखनासाठी त्यांनी चंद्रराव मोरेंच्या वाड्याजवळची शिवथरघळच का निवडावी ? जीवनाची सायंकाळ त्यांनी शिवाजी महाराजांच्या मालकीच्या सज्जनगडावर का व्यतीत करावी ? आणि समर्थांच्या महासमाधी-नंतर त्यांचे सज्जनगडावरील समाधी मंदिर शिवरायांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी यांनीच का बांधावे ? शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा समर्थांशी आलेला संबंध हा केवळ कागदोपत्री पुरावा नाही म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही. ई.स. १६४५ साली शिवछत्रपतींनी पुण्यात हिंदवी स्वराज्याच्या कार्याला प्रारंभ केला आणि नेमके त्याच साली समर्थ रामदास स्वामी आपल्या कार्याला सातारा ते चाफळ या भागात सुरुवात करतात हा केवळ योगायोग म्हणायचा का ? शिवसमर्थांच्या भावी कार्याच्या दृष्टीने ई.स. १६३१ सालची नाशिक येथील समर्थांची आणि शहाजी राजेंची भेट मला अतिशय महत्वाची वाटे. भावी योजनांची काही तरी चर्चा आणि चिंतन या भेटीत झाले असणार.

सौजन्य : चिंता करितो विश्वाची, पान क्र. ९१ ते ९४
               जय जय रघुवीर समर्थ !!!

रामी रामदास शक्तीचा शोध !!!



भगवंतानी भगवदगीतेत आपल्या विभूती सांगत असताना शस्त्रधार्‍यांमध्ये मी राम आहे असे म्हटले आहे. वस्तुत: प्रभू रामचंद्र म्हणजे सौजन्य आणि कारुण्य यांची मूर्ती. पण रामचंद्रांनी शस्त्रांचा कधी त्याग केला नाही. वनवासात जाताना त्यांनी अलंकार, भूषणे टाकून दिली पण वल्कले परिधान केली. मस्तकावरील कोवळ्या केसांना झाडाचा चीक लाऊन जटा वळल्या. तपस्व्याची सर्व बाह्यचिन्हे धारण करणार्‍या प्रभूंनी आपल्या धनुष्याचा त्याग केला नाही. कोदंडपाणी हे रामाचे विशेषण यथार्थ आहे. शस्त्रधार्‍यांमध्ये मी राम आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात याचे आणखी एक रहस्य आहे. राम म्हणजे सज्जनता. सज्जन माणसांनी शस्त्रे बाळगली पाहिजेत कारण शस्त्राचा वापर कसा करायचा याचा विवेक सज्जनांजवळ असतो. आज जगामधे सगळ्या मुस्लीम आणि ख्रिश्चन राष्टांकडे भरमसाठ शस्त्रे आहेत. या शस्त्रांच्या जोरावर ते जगभर दहशतवाद वाढवत आहेत. आम्ही मात्र अजूनही अहिंसेचीच उपासना चालवली आहे. २००० साली डॉ. अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत आम्ही पहिल्यांदा अण्वस्त्रांची चाचणी घेतली. आमचे हे बळ पाहूनच भारतावर आक्रमण करण्याचा मोह पाकिस्तानने टाळला. एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे - "The best way to avoid the war is to be prepared for war for all the times" युद्धाला सर्वकाळ सज्ज असणे हाच युध्द टाळण्याचा एकमेव उपाय आहे. 

जर भारताला जगातील शस्त्रीकरणाच्या स्पर्धेत जिवंत राहायचे असेल तर अहिंसेचा नाद सोडून छत्रपती शिवाजी आणि समर्थ रामदास यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शस्त्रसज्ज व्हावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत परतंत्र असताना लष्कराच्या भरतीचे केलेले आवाहन आज पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे होऊन बसले आहे. क्रिकेटपेक्षा आणि नटनट्यापेक्षा "जय जवान जय किसान" या मंत्राची राष्ट्राला जास्त गरज आहे. दुष्ट माणसांच्या हातात शस्त्रे आली म्हणजे सज्जनांना त्यांच्या अहिंसात्मक धोरणासकट ते नष्ट करणार.

तत्कालीन राजकारणातील ही नाडी समर्थांनी ओळखली म्हणून त्यांनी रामकथेचा पुरस्कार केला. "रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी" असा आदेश समर्थांनी कीर्तनकारांना दिला याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात अरबस्तानातून आलेले पठाण हिंदूंच्या तरुण मुली पळवून नेत होते. रावणानेसुद्धा सीतेला पळवूनच नेले होते; पण रामचंद्र घाबरले नाहीत. निराश तर मुळीच नाहीत. नाही तरी जग मिथ्याच आहे आणि प्रपंच नश्वर आहे म्हणून निष्क्रिय झाले नाहीत. उलट त्यांनी भिल्ल, वनवासी, आदिवासी, गोंडाळ, वानर यांच्यातून सैन्य निर्माण केले. या सर्वांची संघटना उभी केली. अविश्रांत परिश्रमाने सागरावर सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण करून रावणाचा त्याच्या समर्थकांसह वाढ केला. रामकथा प्रसारित करण्यामागे समर्थांना हे सुचवायचे होते की, जे यवन तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांचाशी दोन हात करण्यासाठी संघटीत व्हा, आक्रमक व्हा, बलशाली व्हा, शस्त्रसज्ज व्हा आणि जे लोक तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांना ठार करा.
रामकथेतील प्रसंग झटकन मनावर ठसण्यासारखा होता. कारण स्त्रिया पळवून नेणे, स्वत:चे सैन्य नसणे या बाबतीत रामांची परिस्थिती सामान्य माणसांसारखीच होती. परंतु त्यांनी त्यातून मोठ्या धीराने मार्ग काढला. लोकांनी बलशाली व्हावे म्हणून समर्थांनी गावागावात हनुमंताची मंदिरे उभी केली. हि मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळा होत्या. समर्थांचे बहुसंख्य शिष्य किशोरवयीन किंवा तरुण होते. या सर्वांना समर्थांनी व्यायामाची दीक्षा दिली. हनुमंताची जी आरती समर्थांनी रचली आहे त्यात शेवटी समर्थ म्हणतात -

"रामी रामदास शक्तीचा शोध." आचार्य चाणक्य यांनही स्पष्टपणे म्हंटले आहे कि, कुठल्याही राष्ट्राचा विकास अथवा प्रगती त्याच्या आक्रमण करण्याच्या शक्तीवर अवलंबून असते. युद्धानंतर कोणतेही राष्ट्र झात्याने प्रगत होते हे जर्मनी आणि इस्रायलचा इतिहास आपल्याला शिकवतो. अहिंसेची आणि शांततेची भाषा ऐकायला कितीही गोड असली आणि आदर्शवादी वाटत असली तरी युद्धाची वास्तविकता नाकारता येणार नाही. भगवान रामचंद्र, महावीर हनुमान, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून युद्धाचे प्रसंग वगळा आणि त्यांचे चरित्र लोकांना सांगा ! पराक्रम वजा केला तर त्यांच्या चरित्रातून नेमकी कोणती प्रेरणा घ्यावयाची ?

सौजन्य : चिंता करितो विश्वाची, पान क्र. ११८ ते ११९ 
               जय जय रघुवीर समर्थ !!!