Tuesday, May 6, 2014

॥ समर्थ विचार - २ ॥

सर्व मित्रांना जय रघुवीर,

हल्लीच आपण सर्वजण पाहात आणि ऐकत आहोत कॉग्रेसी युवा नेते "दिग्विजय सिंग" ह्यांचे कारनामे, अशा लोकांविषयी समर्थांचे मत !

जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥

सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥

परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥

कामवासनेपायी अत्यंत स्त्रीआधीन जीवित जगणारा तो मूर्ख :
ज्या आईबापांच्या पोटीं जन्म घेतो त्यांच्यावरच उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो, इतर सर्व नातेवाईकांना बाजूस सारून जो बाईलबुध्या बनतो, आपलें अंत:करण फक्त बायकोपाशींच उघड करतो, जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासुरवाडीस अन्हुत जाऊन राहतो, कुलशील न पाहतां कोणत्याही मुलीशीं लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा.

जय श्रीराम !!!