Wednesday, May 21, 2014

कलंकी पुढे देव होणार आहे

सर्वांना जय रघुवीर,

आपण देशात झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, तसेच विजयी पक्ष भा. ज. पा चे पंतप्रधान पदाचे उमेदवार मा. नरेंद्र मोदी यांची औपचारिक रीत्या पंत्रप्रधान पदी निवड झाली. काल परवा निवड झाल्यानंतर नरेंद्र भाई मोदींनी प्रथमच सेंट्रल हॉल मघ्ये बोलताना स्पष्ट केल की हे सरकार नेमके कोणासाठी समर्पित आहे, हे सरकार देशाच्या गरीब जनतेसाठी आहे, शोषितांसाठी आहे, पिडीतांसाठी आहे आणि मागासवर्गीय यांचे आहे.

हे त्यांचे उद्गार ऐकताना सहज समर्थांच्या मनाच्या श्लोकातील हा श्लोक आठवला. मुळात देव म्हणजे फक्त अवतारी पुरुष नसुन ती एक श्रध्दा, शक्ती आणि विश्वास आहे. अत्यंत वाईट परिस्थीत घीरपणे, धीट्पणे सर्व प्रसंगाना सामोरा-जात बदल घडवुन आणतो तोही देवच !

अनाथां दिनांकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढें देव होणार आहे ॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥

स्वधर्माचे पालन, आचरण करुन इतरांनाही नवी प्रेरणा देत, देशाच्या राजकीय सत्तेत राज्यक्रांती घडवुन आपल्या अलौकिक संस्कृतीचे पालन करणारा नेता देवापेक्षा मोठा नाही, परंतु देवापेक्षा कमी देखील नाही. सगळी कडे त्राही त्राही होत असताना आपले राज्य सोडून राष्ट्र्हितार्थ, राष्ट्र संरक्षणार्थ तो सर्वस्वाचा त्याग करुन खंबीर नेतृत्वाने सर्वांची मने जिंकून, सर्वांना समान हक्क, कायदा आणि सुविधा देण्याचा निश्चय करतो, अशांना साहजिकच भगवंतच पाठवत असतो आपल्या अंशरुपाने म्हणुनच समर्थ सांगतात,

जनाकारणें देव लीळावतारी ।
बहूतांपरी आदरें वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महां नष्ट चांडाळ पापी ॥१२६॥

जे लोक स्वच्छ कारभार करत नाहीत आणि भ्रष्टाचाराने देशाची अर्थिक, सामाजीक परिस्थीती आणि सांस्कृतीक वारसा मलीन करतात ते खरोखरच बुध्दीने दुष्ट असून पापीच आहेत.

शेवटी सारांश एकच....

धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥

श्रीराम !
www.samarthramas.co.in