Tuesday, May 6, 2014

॥ समर्थ विचार - ३ ॥

सर्वांना जय रघुवीर,

सध्या आपण पहातच आहोत निवडणुकीचे वारे देशभर असुन दोनच ठिकाणचे मतदान शिल्लक आहेत. एखाद्या देशातील राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते यालोकांजवळ काय नसावे याचा विचार सर्वांनीच समर्थांच्या दासबोधातील खालील ओवी वाचून करावा.

किंत भांडण झगडा कळहो अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो
चाहाड वेसनी विग्रहो निग्रहकर्ता ।। द. २, स. ३

संशय, वाद, हातघाई, घरघुती कलह, धर्मभ्रष्ट, लोकाचारविरोधी वर्तन, अनेक कारणांनी सतत शोकग्रस्त, चहाडखोर, व्यसनी, कलागती लावून देणारा, दुसर्‍यांना प्रत्येक बाबतीत विरोध करणारा.

वर सांगितलेली कुविद्या लक्षणे आपल्या भारतीय नेते मंडळीत बक्कळ भरलेल्या दिसतात. सामान्य जनतेने देखील आपल्या देशाच्या नेत्या संबधीत विचार करताना आपल्यात या लक्षणांचा अंगिकार झालेला नाही याचे आत्मपरिक्षण तितकेच महत्वाचे. एका पासून अनेकां पर्यंत पसरणार्‍या साथीच्या रोगांसारख्या ह्या गोष्टी सगळ्याचांच घात करतात.

जय श्रीराम !!!